मुंबई | मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. सर्वसामान्यांची तपासणी केल्याशिवाय मंत्रालयात कोणालाही परवानगी नाही. सर्व नेत्यांसाठीदेखील इथं चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते. पण असं असताना देखील मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये चक्क बाटल्यांचा खच सापडलेला आहे. सदर घटना साम वृत्तवाहिनीने मद्यमांसमोर प्रथमदर्शी आणली होती.
मुंबईतल्या मंत्रालयातून राज्याचा गाडा हाकला जातो. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी तपासणी केली जाते. पासशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मंत्रालयात चक्क दारुच्या बाटल्यांचा खच कसा आला? असा सवाल उपस्थित होत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, आता कळले..ठाकरे सरकार मधील काही मंत्री गुलाबराव आणि नवाब भाईसारखे येड्या सारखं का बडबड करत असतात..झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार?, असं म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.
आता कळले..
ठाकरे सरकार मधील काही मंत्री..
गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत असतात..
झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार?— nitesh rane (@NiteshNRane) August 10, 2021