शेतकऱ्यांशी चर्चेचा ऑलिंपिक गेम सुरुय का? – संजय राऊत

शेतकऱ्यांशी चर्चेचा ऑलिंपिक गेम सुरुय का? – संजय राऊत

केंद्रानं पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात मागच्या एक महिन्यापासून देशभरातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारं आणि शेतकरी संघटना यांच्यात अनेक चर्चा होऊन सुद्धा अदयाप तोडगा निघाला नाही. आत या शेतकरी आंदोलनाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा देण्यात येत आहे. त्यात चर्चेचा अनेक फेऱ्या होऊन सुद्धा अद्याप तोडगा निघालेला नाही. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चेचा पहिले राऊंड, दुसरे राऊंड असे विक्रम करतेय. हा काही ऑलिम्पिक गेम सुरु आहे का? आशियाई गेम सुरु आहे का, खरेतर पहिल्याच दिवशी हा प्रश्न निकाली लागायला हवा होता. गेल्या ६० दिवसांपासून पंजाब. हरियाणाचा शेतकरी आंदोलन करत आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारताना संशयही व्यक्त केला आहे.

पहिल्या राऊंडमध्येच न्याय मिळायला हवा होता. मला असे वाटतेय की यामागे एक अदृष्य शक्ती आहे. जिला देशातील वातावरण बिघडवायचे आहे. तसेच आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला. भाजपाने तेव्हाच निर्णय घेतला असता तर त्याचा त्यांनाच फायदा झाला असता. परंतू प्रजासत्ताक दिनापर्यंत शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणे हे दुर्दैव आहे. केंद्र सरकारला पुढे ते करावेच लागणार आहे, असे राऊत म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: