मुंबई | अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला घेऊन जाणाऱ्यांसोबत भाजपचे पदाधिकारी कसे? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्यचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मलिक यांच्या दुखत्या नसेवर बोट ठेवलं आहे. मलिक यांच्या पोटात का दुखते हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या दुखऱ्या नसवर मी बोट का ठेवू? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोल लगावला आहे. एनसीबी म्हटल्यावर मलिकांच्या पोटात का दुखते हे सर्वांना माहीत आहे. ड्रग्स होते की नाही पार्टी होते की नाही हे काढण्याऐवजी हा होता की तो होता हे ते सांगत आहेत. त्याची दुखरी नस वेगळीच आहे. त्यांच्या जखमेवरची खपली मला काढायची नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना फडणवी म्हणाले की, आम्ही कोणीही प्रचाराला गेलो नाही. मी, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवारीह प्रचाराला गेलो नाही. तरीही आम्हालाच जनतेने निवडून दिले. २५ ट्केक जागा भाजपला मिळाल्या. २५ टक्के जागा अपक्षांना मिळाल्या आणि उरलेल्या ५० टक्के जागा आघाडीच्या तीन पक्षांना मिळाल्या आहेत. म्हणजे त्यातही आम्हीच सरस आहोत. या निकालाने भाजप नंबर १ पक्ष तर शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. सत्ता असूनही ते चौथ्या नंबरवर गेले आहेत, असं नाव न घेता सेनेला टोला लगावला आहे फडणवीस म्हणाले.