मुंबई | मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जयंती निमित्त रविवारी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला होता यावेळी त्यांनी विरोधात बसलेल्या भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली होती. आता त्यापाठोपाठ मित्रपक्ष आसलेल्या राष्ट्र्वादीने सुद्धा भारतीय जनता पक्षावर टीका केली होती.
नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, भाजपवर टीका केली आहे. ज्या पक्षांनी हातमिळवणी केली, भाजपने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. त्यामुळे आता सेना-भाजपा वादात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टीका केली आहे.
जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत, त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार आहे. जसे काळजीवाहू सरकार असते, तसे हे काळजीवाहू विरोधक आहेत. त्यांचा स्वतःच स्वतःच्या काळजीने अंत होणार आहे. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही. हे काळजीवाहू विरोधक कोणे एकेकाळी आपले मित्र होते. हे नाही म्हटले तरी आपले दुःख आहे. याचे कारण आपण त्यांना पोसले.
मी गोरेगावच्या शिबिरात म्हटलो होतो की आपली २५ वर्षे युतीत सडली. तीच माझी भूमिका आणि मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यानंतर आता नवाब मलिक यांनी यावर भाष्य केले आहे.