पुणे : सध्या संपूर्ण देशभरात विविध राज्यांकडे मोठया प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यात १ मे पासून सुरु होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास अनेक राज्यांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यात भाजपा सरकारची सत्ता असलेल्या राज्यांचा सुद्धा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी लसीच्या मुद्यावरून केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
लस निर्मिंती सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्राने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्राने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी लसींचे डोस मागितले आहेत. मात्र, आतापर्यंत आपल्याला फक्त ३ लाख डोस मिळाले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगाने लसीकरण करण्याचा मनसुबा राज्य सरकारला अंमलात आणता येणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
अजित पवार शनिवारी पुण्यात पत्रकार माध्यमांशी संवाद साधनात बोलत होते . यावेळी अजित पवार यांनी लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकार सिरम आणि परदेशी कंपन्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच 12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
ल्या काही दिवसांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत जागून हे अधिकारी वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन निर्मिती कशी करता येईल, याचा आढावा घेत होते. अनेक ठिकाणी आता ऑक्सिजन प्लांटस उभे राहत आहेत. जेणेकरून कोरोनाची तिसरी लाट आली तरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
हे ही वाचा :
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन