उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारामुळे सध्या देशात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला असून अनेक ठिकाणी उद्रेक पहायला मिळत आहे. विरोधकांकडून याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक केल्याची मागणी केली जात असताना अजय मिश्रा मात्र आपला मुलगा त्यात सहभागी नव्हता असं सांगत आहेत.
या बाबत त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. कार आपल्याच मालकीची आहे याची कबुली देताना अजय मिश्रा यांनी गाडीवर दगड, विटांचा हल्ला झाल्याने ताबा गेला आणि ही दुर्घटना झाली असा दावा केला आहे. दरम्यान याप्रकरणी अनेक व्हिडीओ समोर येत असून वेगवेगळे दावे केले जात आहे. त्यातच या घटनेचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काळ्या रंगाची एसयुव्ही वेगाने धावत असून निशस्त्र असणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळण्यात आलेली नाही.
केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडल्यानंतर हिंसाचार उफाळला. वाहनांखाली चिरडलेल्या चार शेतकऱ्यांसह या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. यानंतर विऱोधकांकडून घटनेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओत अजय मिश्रा यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे गाडीवर दगड, विटांचा हल्ला होताना दिसत नाही. याउलट चालकाकडे गाडीता ताबा असून अत्यंत वेगात पळवत त्याने शेतकऱ्यांना चिरडल्याचं दिसत आहे. त्यामुळे मोदी सरकारचा मंत्री आपल्या मुलालाल वाचवण्यासाठी धडधडीत खोटं बोलत आहे,
The clearest video of Lakhimpur Kheri incident yet
Farmers were walking peacefully and the car violently comes and runs them over. Very Shocking. pic.twitter.com/3kkBYn8lVE
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) October 6, 2021