“हे सरकार बेवड्यांना अन् दाऊदला समर्पित, यांचा खरा चेहरा आता समोर आला”

 

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवारपासून सुरूवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत भाजप नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे की दाऊदच्या सहकाऱ्यासोबत व्यवहार केल्याचा आरोप असलेले कोठडीत असूनही ठाकरे सरकारने राजीनामा घेतला नाही. मुंबईच्या खुन्यासोबत व्यवहार करणाऱ्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप अधिवेशनात संघर्ष करेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार फक्त बेवड्यांसाठी काम करतं. मद्य व्यवसायाला हवा तसा पाठिंबा देतं. हे सरकार बेवड्यांना समर्पित असलेलं सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा या सरकारच्या काळात झाला असल्याचा दावाही फडणवीसांनी केला आहे.

Team Global News Marathi: