शिवसैनिकानं स्वत:च्या रक्तानं लिहिलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र

शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेना कशाला भगदाड पडले असून अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे तर काही शिवसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे अशातच आता एका कट्टर शिवसैनिकाने चक्क स्वत:च्या रक्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. हे पत्र लिहून त्यानं आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याची हमी दिली आहे.

सध्या हे पत्र भंडारा जिल्ह्यात चांगलचं व्हायरल होत आहे. पवन खवास असे या शिवसैनिकाचे नाव आहे. या पत्राद्वारे त्यांनी शिवसेना पक्षासोबत आपण आजही निष्ठेने सोबत राहू अशा आशयाचे भावनिक पत्र त्यांनी लिहिलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उलथापालथ झाली आहे. सातत्यानं नवनवीन घडामोडी सुरु आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन गटात खरी शिवसेना आमचीच असे दावे सुरु आहेत. त्यामुळं शिवसेनेची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे. शिवसेनेला आता खरी शिवसेना हीच आहे, हे सिध्द करण्याचं आव्हान आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालत प्रत्येक तालुक्यातून शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचं आवाहन केलं होतं.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील युवा शिवसैनिक पवन खवास तरुणानं स्वतःच्या रक्तानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षनिष्ठेनं प्रेमपूर्वक निष्ठेनं पत्र लिहलं आहे. साह्य या पात्राची राज्यभरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

रोज रिकाम्या पोटी करा मधाचे सेवन, लठ्ठपणा लोण्यासारखा विरघळेल

अरविंद केजरीवाल यांचा सिंगापूर दौरा रद्द, ‘आप’चा मोदी सरकारवर आरोप

Team Global News Marathi: