शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प महत्वपूर्ण

 

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचं, शेतकरी बांधवांचं मोठं योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. त्यामुळं या स्मार्ट प्रकल्पाला गती द्यावी, त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात यावं, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबवण्यात यावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. बँकेचा विश्वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविल्यामुळं राज्यातील शेतकरी बांधवांची सर्वांगीण प्रगती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात यावा. या प्रकल्पाला शासन स्तरावरुन आवश्यक असणारी सर्व मदत करण्यात येईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Team Global News Marathi: