सांगली | सांगलीमध्ये भाजपचे दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या हाती लागले असून लवकरच या दोन नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का बसणार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता.
तसंच नबाव मलिक यांनीही तशी शक्यता बोलूनही दाखवली आहे. अखेर रास्तवराडीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगलीत लवकरच भाजपचा करेक्ट कार्यक्रम होण्याची चिन्ह आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपचे दोन माजी आमदार हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्यासाठी तयारी केली आहे.
या दोन्ही नेत्यांबद्दल राष्ट्रवादीने कमालीची गुप्तता बाळगली आहे. लवकरच त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील आणि शिराळयाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक या चार पैकी २ आमदारांच्या नावाची चर्चा रंगली आहे. मात्र ha पक्षप्रवेश काडी होणार हे अदयाप गुलदस्त्यात आहे.