मालदीवहून परतलेल्या सेलिब्रिटींचं नेटकऱ्यांनी असं केलं स्वागत !

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाने धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. त्यात मोठया संख्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर१५ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये चित्रपटाचे शूटिंग बंद असल्याकारणामुळे अनेक कलाकारांनाही देशाबाहेर सुट्टीचा आनंद घेतला होता. मात्र कलाकारणाच्या या निर्णयामुळे अनेक नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच फाटकराले होते.

त्यात अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, हे मालदीव ला सुट्ट्या साजऱ्या करत होते तर आजच ते मुंबईत परतले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी त्यांना निषाणा साधत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. मुंबई एअरपोर्टवरील त्यांचे फोटो पाहून अनेकजणांनी संताप व्यक्त केला आहे. एका युझरने लिहिलं परत येण्याची गरज नव्हती. तर एकाने लिहिलं, लॉकडाउन हा फक्त गरिबांसाठी आहे. तर काहींनी त्यांचे चित्रपट पाहणार नसल्याचं म्हटलं आहे.

‘लोकांना जेवायला अन्न नाही, आणि तुम्ही सुट्ट्यांवर पैसे उडवत आहात, थोडी तरी लाज बाळगा, त्यांनी तर मालदीवचा तमाशा करून सोडलाय. मला माहित नाही त्यांची टुरिझम इंडस्ट्रीसोबत काय अरेंजमेंटस आहेत, मात्र या लोकांनी निदान माणुसकी म्हणून आपल्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर न टाकता स्वतः पुरता मर्यादित ठेवावेत असा टोला अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी याने सहकलाकारांना लगावला होता.

Team Global News Marathi: