मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या विमान प्रवासावर सरकारच्या पैशाची उधळपट्टी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या मीडिया सेल प्रमुखांनी लावला होता. या विरोधात ते कोर्टात सुद्धा केले होते. मात्र आता कोर्टाने भाजपाला या प्रकरणावरून चांगलेच झापले आहे.
आम्ही सध्या अत्यंत तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेत असून तुम्ही दाखल केलेल्या प्रकरणात महत्त्वाचे असे काय आहे असे खडेबोल सुनावत हायकोर्टाने याप्रकरणी वकिलाला जाब विचारला आहे. एवढेच नव्हे तर या याचिकेत तातडीचे काहीच दिसत नाही असे स्पष्ट करत त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिला.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोविड काळात चार्टर्ड विमानाने मुंबई, नागपूर, हैदराबाद आणि दिल्ली असा प्रवास केला. त्यांच्या दौऱयावर एमएसईबीने खर्च केला, त्यासाठी १४.४५ लाख रुपये खर्च करण्यात आले ही माहिती आरटीआयद्वारे काढण्यात आली असून वैयक्तिक कारणासाठी राऊत यांनी विमान सेवा वापरल्याचा आरोप भाजपच्या मीडिया सेल प्रमुख विश्वास पाठक यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने त्यांनाच या प्रकरणात झापले आहे.