राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर…; अयोध्या दौऱ्यावरून थेट बृजभूषण यांना मनसेचं आव्हान

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे जूनच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. यावर भाजपाचे तेथील खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. राज ठाकरेंना बृजभूषण यांनी विरोध केला आहे. अयोध्याच्या जमिनीवर त्यांना घुसू देणार नाही, असे आव्हान बृजभूषण यांनी दिल्याने इकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

यावर मनसे नेत्यांनी लालबागमध्ये बॅनर लावले असून राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा जसजसा जवळ येईल तसतसे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना रोखावं अन्यथा संत, नागासाधू यांचा सामना करावा लागेल, असं थेट पत्र कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. राजकीय लढाई करायची असेल तर जरूर करा, पण देवदर्शनासाठी जर कुणाला अडवत असाल तर याद राखा. सर्व साधू संतांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा आहे असं गुरु माँ कांचनगिरी यांनी सांगितले.

बृजभूषण सिंह यांनी स्वत:कडे पाहावं. ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत. त्यांनी इतरांना शिकवू नये. राजकीय पब्लिसिटीसाठी ते चमकोगिरी करत आहेत. बृजभूषण यांनी त्यांचा इतिहास बाहेर काढण्यासारखी वेळ आणू नये. तुम्हाला उत्तर प्रदेशातील नागरिकांची दया असती तर कंपनी, फॅक्टरी लावून यूपीतील लोकांना सक्षम बनवलं असतं. राज ठाकरे ५ तारखेला येतील कोण अडवतं ते पाहूच असा इशारा त्यांनी दिला.

Team Global News Marathi: