सिंधुदुर्ग | नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही. मुंबईत मराठी माणसाला कोणी न्याय दिला, मराठी माणसाला कोणी टिकवलं हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राची अस्मिता ज्यांनी टिकवली त्यांना ठाकरे म्हणतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना राणेंशी होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, जेव्हा तुम्ही बंदुका घेऊन फिरत होता, खंडणी गोळा करत होता, अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत होतात तेव्हा तुमचा आणि आमचा वाद होता का? त्यामुळे तुमच्यावर कारवाई केली असा सवालही शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारला. नारायण राणेंच्या माणसांनी श्रीधर नाईक यांची हत्या केली तेव्हा त्यांचा आणि आमचा वाद होता का असाही सवाल यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित केला.
आमदार दीपक केसरकर म्हणाले की, “राज्यात आमची सत्ता आहे, तरी देखील आम्ही कायदा हातात न घेता राणेंना सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. जर आम्ही सत्तेचा वापर केला असता तर नितेश राणेंची हॉस्पिटलमध्ये नव्हे तर जेलमध्ये रवानगी केली असती. यावरुनच इथे सत्तेचा वापर केला जातो की नाही समजतं.