लोकांनी पुढे येऊन राज कुंद्रासारख्या लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे – राजू श्रीवास्तव

 

शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्न फ्लीम निर्मितीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी सोमवारी रात्री भायखळा येथे बोलावलं होत, त्यानंतर राज कुंद्रा यांच्या अटकेची माहिती समोर येत आहे. यावर आता कॉमेडियन राजू श्रीवास्तव याने प्रतिक्रिया दिलेली आहे.

राज कुंद्राच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया राजू श्रीवास्तव म्हणाला की, राज कुंद्रासारखे लोक पैसे कमावण्यासाठी काहीही करु शकतात. अशा लोकांना देशाच्या संस्कृतीचं काही घेणंदेणं नसतं. अशा लोकांवर सोशल बाॅयकाॅट करण्याची गरज आहे. आजकाल वेब सीरिजमध्येही खूप अश्लीलता दाखवली जाते. मी या गोष्टींचा याआधीही विरोध केला आहे.

भोजपुरी चित्रपटांमध्येही खूप अश्लीलता दाखवली जाते. मी याविषयी आवाज उठवला आहे. तसेच योगी सरकारकडेही तक्रार केली आहे. यातच आता राज कुंद्राचंही हे घाणेरडं कृत्य समोर आलं. आपल्या घरी खूप पैसा आला पाहिजे एवढंचं त्यांचं उद्दिष्ट्य असतं. पैसे कमावण्यासाठी लोकं आपला धर्म, इमानदेखील विकायला तयार झाल्यासारखं वाटत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राजूनं दिली आहे.

Team Global News Marathi: