Thursday, September 21, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओठात एक आणि पोटात एक’ राज ठाकरे यांच्या भूमिकेवर अजित पवारांचे मत

by Team Global News Marathi
November 28, 2022
in राजकारण
0
ओठात एक आणि पोटात एक’ राज ठाकरे यांच्या भूमिकेवर अजित पवारांचे मत

 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महापुरुषांबाबत मत व्यक्त करताना त्यावरून वाद व्हायला नको, अशी भूमिका घेतली. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही काल आपल्या सभेत तीच भूमिका मांडली. यानंतर आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना महापुरुषांच्या विषयावर राज ठाकरेंनी तुमचीच भूमिका घेतली का? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंचे विचार त्यांच्याबरोबर, माझे विचार माझ्यापर्यंत सीमित आहे. आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडली. आमच्या ‘ओठात एक आणि पोटात एक’ अशी भावना कधीच नसते. हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. म्हणून मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला होता. कधी कधी आम्ही जे बोलतो ते आमचे वैयक्तिक मत असते, ती पक्षाची भूमिका नसते. बहुदा पक्षाची भूमिका प्रवक्ते, पक्षाचे प्रांताध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष मांडत असतात. परंतु, विरोधी पक्षनेता म्हणून सार्वजनिक क्षेत्रात वावरताना मला जे वाटते ते मी माध्यमांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अजित पवार म्हणाले, आम्ही सत्तेत असताना इतर मागास समाजाला आरक्षणासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. आमची अपेक्षा होती की, ताबडतोब निवडणुका व्हायला पाहिजे, खासदार संसदेत, आमी विधिमंडळात आणि नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात भूमिका मांडत असतात. सर्वांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. परंतु नंतरच्या काळात राजकीय स्थित्यंतर अशी घडली की, सततच या निवडणुका पुढे पुढे चालल्या आहेत.

सहकार क्षेत्रातील निवडणुका झाल्याही आणि जे निवडून यायचे ते आलेही. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का होत नाहीत? एखादा विषय न्यायव्यवस्थेच्या समोर असेल तर त्याचा अंतिम निर्णय न्यायव्यवस्था घेत असते. मात्र, सत्ताधारी असो की विरोधी पक्षाचे लोक असो, सर्वांनी एकच निर्णय घ्यायला पाहिजे. फेब्रुवारी २२ला महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका व्हायला हव्या होत्या. आता डिसेंबरमध्ये १० महिने होतील, तरी निवडणुका होत नाहीत, अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई येत्या ३ डिसेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर

चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई येत्या ३ डिसेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group