मुंबई | खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पुणे येथील एका सभेत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देऊन येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांना पंतप्रधान आणि अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी जास्तीत जास्त खासदार आणि आमदार निवडणून आणायचे विधान केले होते. आता त्यांच्या या विधानावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही. स्वप्न कुणीही पाहू शकतं. परंतु या तिन्ही पक्षात समन्वय नाही हे मी आधीपासून सांगत आलोय. त्यांच्या मधील समन्वयाच्या अभावमुळे त्यांच्या-त्यांच्यामध्येच अडचणी निर्माण होतायत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी केली.
आदरणीय शरद पवार साहेब यांना देशाचे पंतप्रधान आणि अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताना आपल्याला बघायचं आहे. आता आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे. त्या नेतृत्वाकडून आणखी अपेक्षा करण्यापेक्षा त्या नेतृत्वाला आणखी बळ देण्याची गरज आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.