मुंबई | मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेवर चित्रपट करत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र त्यांच्या या ट्विटनंतर सर्व स्थरातून त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसून येत आहे.
महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीच्या मुहूर्तावर महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामला सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. महेश मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटाची घोषणेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांना खंडोबा सुद्धा सुनावले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत मांजरेकरांवर निशाणा साधला. महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय? असा संतप्त सवाल त्यांनी केली आहे. तसंच लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेलं नाटक असल्याचं आरोपही केला आहे. महेश मांजरेकरांनी सिनेमाचा टीझर शेअर करताना म्हटलं आहे आहे की, वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा! संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त ‘गोडसे’ सिनेमाची घोषणा केली आहे’.
Who is Mahesh Manjrekar … wat is his contribution to Indian Cinema….to seek attention such dramas are needed pic.twitter.com/nf2S1l2CAE
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 2, 2021