”नवाब मलिकांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले” भाजपा नेत्यांचा खळबळजनक आरोप

 

डी कॉमपनीबरोबर जमीन व्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजपने घणाघाती टीका केली आहे. अशातच आता आमदार श्वेता महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकयांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिकांनी मुंबईत, शिवसेना भवनाबॉम्बस्फोट घडवून आणले असून आणि त्याच नवाब मलिकांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेपुढे आले आहेत,असं वादग्रस्त विधान श्वेता महाले यांनी केलं आहे.

तसेच पुढे बोलताना आमदार महाले यांनी यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. टीव्ही 9 या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. शिवसेनेचं हिंदुत्व फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापूरते राहिलं आहे. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस बरोबर सत्तेत बसली, त्याच दिवशी त्यांनी हिदुत्वाला लाथ मारली, असं वादग्रस्त वक्तव्यही श्वेता महाले यांनी केलं आहे.

एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना संरक्षण दिलं जात असून योजना दिल्या जात आहेत. ज्या हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले, मोठे झाले ते हिंदुत्व मात्र पक्षप्रमुख विसरले असल्याची टीका श्वेता महाले यांनी केली आहे. तसंच काँग्रेससोबत जाणारी शिवसेना उद्या जर एमआयएमसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको, असंही त्या म्हणाल्या. ज्या नवाब मलिकांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले. त्यांनाच वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. हे दुर्देवी असल्याची टीका भाजप आमदारांनी केली आहे. शिवसेनेचं हिंदुत्व निघून गेलं आहे अशी टीका सुद्धा महाले यांनी केली आहे.

Team Global News Marathi: