ड्रग्स प्रकरणात एनसीबीने शारुख खान याचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शीतयुद्ध पेटलेले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणात खळबळजनक खुलासा केला आहे. प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला यांनी बोलावल्यामुळेच आर्यन खान त्या क्रूझ पार्टीत गेला होता असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
तसंच प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला आणि ऋषभ सचदेवा या तिघांनाही एनसीबी’ने ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांना सोडून देण्यात आलं. ते का सोडून देण्यात आलं याचं उत्तर एनसीबी’ने द्यावं अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. प्रतिक गाबा हा क्रूझवरील पार्टीचा को-ऑर्डिनेटर होता. त्यानेच आर्यन खानला पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. आर्यनने तशी माहितीच दिललेली आहे. तसेच आमीर फर्निचरवाला यांनीही आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. या दोघांचाही या पार्टीच्या आयोजनात सहभाग असल्याचं सांगितलं जातं.
प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला यांची नावं कोर्टात उल्लेख करण्यात आला. या दोघांच्या बोलावण्यावरुन आर्यन खान तिकडे गेला होते. १३०० लोकांच्या जहाजावर रेड टाकली, रात्री १२ तास रेड टाकण्यात आली, त्यापैकी ११ लोकांना ताब्यात घेतलं, या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यानंतर तीन जणांना सोडण्यात आलं, ते कुणाच्या आदेशावरुन हे एनसीबीने सांगावं, असा सवाल मलिक यांनी केला आहे.