“नवाब मलिक आणि ज्यांच्यावर आरोप केले त्या सर्वांची नार्को टेस्ट करा’

 

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी एन्सीएबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनके गंभीर आरोप लावून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यातच रोज पत्रकार परिषेद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप लगावत या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नाव गोवण्याचा प्रयत्न मलिक यांनी केला होता. याच मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते.

त्यावरच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आशिष शेलार यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी समान न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून चांगलंच वातावरण तापलं असल्याचं दिसून येत आहे.

गेले काही दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणी होत असताना पाहायला मिळत आहे. तसेच नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केले त्या यंत्रणांमधील लोकांची नार्को टेस्ट व्हायला हवी, अशा पद्धतीची मागणी आशिष शेलार यांनी केली असून आरोप करणाऱ्यांना आणि ज्यांच्यावर आरोप झालेत या दोघांनाही समान पद्धतीने राज्य सरकारने वागवायला हवं, नाहीतर सरकारमध्ये बसलेल्या इतर लोकांविषयीचा संशय बळावू शकतो, त्यामुळे आशिष शेलार यांनी नार्को टेस्टची मागणी केली आहे.

Team Global News Marathi: