Thursday, May 26, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई, कोकणात उष्णतेची लाट; उष्मघाताची लक्षणे घ्या जाणून

by Team Global News Marathi
March 15, 2022
in आरोग्य
0
मुंबई, कोकणात उष्णतेची लाट; उष्मघाताची लक्षणे घ्या जाणून
ADVERTISEMENT

 

मुंबई | उन्हाळ्याने वर्दी दिली असून उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणासाठी इशारा जारी केला आहे. रविवारी मुंबईचं तापमान 38.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी उत्तर कोकण, ठाणे, मुंबई, रायगड उष्णतेच्या लाटेसह यलो अलर्ट जारी केला आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

उष्णतेची लाट आल्याने लहान मुलं, वृद्धांसह आधीच आजारी असलेल्यांनी सावध राहण्याची गरज आहे. यामुळे शरीरात पेटके येणे, थकवा येणे, उष्माघात यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राहिल. गुजरातच्या सौराष्ट्र आणि राजस्थानच्या कच्छमध्ये अनेक ठिकाणी 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्याने तिथे उष्णतेची लाट आली आहे. या परिसरातून उष्ण आणि कोरडे वारे उत्तर कोकणाच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे उत्तर कोकणासह मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील तापमान वाढलं आहे.

ADVERTISEMENT

उष्माघाताची लक्षणे कोणती ?

थकवा येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होणं, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे, रक्तदाब वाढणे ही उष्माघाताची काही लक्षणे आहेत. थकवा आणि हीट स्ट्रोक अर्थात उष्माघातामधील मुख्य फरक असा की हीट स्ट्रोकमध्ये घाम येत नाही.

ADVERTISEMENT

काय काळजी घ्यावी?
– तापमान अधिक वाढल्याने उन्हात बाहेर पडणं टाळा. घराबाहेर पडणं गरजेचं असल्यास छत्रीचा वापर करा. टोपी किंवा रुमालाने डोकं झाका. हलके आणि सुती कपडे परिधान करा.

– हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज 500 मिली जास्त असते. त्यामुळे जरी तहान लागली नाही तरी जास्त प्रमाणात पाणी प्या.

– चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंकऐवजी ओआरएस, लिंबू सरबत, ताक आदी पेय प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवता येऊ शकतं.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

होळीच्या दिवशी घरच्या घरी बनवा नैसर्गिक रंग

Next Post

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • अनिल परबांच्या अटकेनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष
  • ‘तू आणि मी, मी आणि तू’ सिनेमाचे पोस्टर रुपाली चाकणकरांच्या हस्ते झाले रिलीज
  • मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कॉम्पुटरसह इत्तर यंत्रणा पडली बंद
  • जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात, चंद्रकांत पाटलांची टीका
  • छत्रपती संभाजीराजे भाजपवर ऐवढे नाराज का आहेत?;

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group