मुंबई | बाबरी मशीद पडण्याच्या मुद्द्यावरून भाजपा नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून नाव वाद निर्माण झाला होता. अशातच या विधानावरून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाने चंद्रकांत पटलावर जोरदार निशाणा साधला होता. बाबरी जेव्हा पाडली तेव्हा हे सगळे ‘उंदीर’ बिळात लपले होते. भाजपकडे कोणतंही शौर्य नव्हतं. बाबरी पाडली त्या वेळी दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.
चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त दावा केला त्यावर उद्धव प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. आज मातोश्री येथून पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपकडे शौर्य नव्हतं त्यावेळी मुंबई शिवसेनेनी वाचवली आहे. त्यावेळी पंतप्रधानांचं नााव देखील कुठेही नव्हतं. बाबरी पाडली त्या वेळी दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली. बाबरी मशिदीबाबत ही बातमी आली तेव्हा बाळासाहेबांना फोन आला तेव्हा ते बोलले माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत.
आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे मोहन भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. एका मस्तीत चंद्रकांत पाटील बोलतायत त्यांनी अडवाणींची मुलाखत पाहावी.