उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे वाद-विवाद काही संपता संपत नाहीये. आम्ही उद्धव ठाकरेंवर कोणतेही गंभीर आरोप करणार नाही, असे म्हणणारेच शिंदे गटाचे नेते थेट मातोश्रीवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. अशातच शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक गंभीर आरोप केला आहे.
हा आरोप करत जाधव म्हणाले की, मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला १०० कोटी रूपये नेले जात होते. सचिन वाझे हेच मातोश्रीवर हे खोके घेऊन जात होते, असा दावाही प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून आले होते.
मेहेकरमध्ये गुलाबराव पाटलांची रॅली काढून जोरदार स्वागत केले होते. त्यानंतर हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवरच गंभीर आरोप केले आहे. ५० खोके एकदम ओके म्हणताना शंभर खोके मातोश्री ओके तेही दर महिन्याला जात असतं, असं म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंवरच गंभीर आरोप केला आहे. मातोश्रीला दर महिन्याला शंभर खोके जात असल्याचा हा दावा करून प्रतापराव जाधव यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे.