Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

लाखभर जनता पदरमोड करून मुंबईच्या रस्त्यावर का उतरली? याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा

by Team Global News Marathi
December 19, 2022
in राजकारण
0
लाखभर जनता पदरमोड करून मुंबईच्या रस्त्यावर का उतरली? याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा

 

मुंबई | महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी भायखळा ते आझाद मैदान असा झालेल्या मोर्चानंतर सुरू झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चावर केलेली टीका ही मोर्चा यशस्वी झाल्याचा पुरावा असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे. भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे फडणवीस-शिंदे सरकारचे श्रद्धास्थान आहे. त्यांचा अश्वारूढ पुतळा समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वारावर सरकार उभा करेल असे लोकांना वाटू लागले असल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटाने लगावला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात आज मोर्चावर टीका करणाऱ्या भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. लाखभर जनता पदरमोड करून मुंबईच्या रस्त्यावर का उतरली? याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करणे आवश्यक असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होत असताना राज्याचे सरकार मूकबधिर होऊन बसले आहे.

कारण की दिल्लीने त्यांना गुंगीचे इंजेक्शन टोचून पाठवले आहे. या गुंगीचा असर ओसरला की, पुढचे इंजेक्शन देऊन सरकारला झोपवून ठेवले जाते. या गुंगीतून जागे करण्यासाठी मुंबईत त्वेषाने मोर्चा निघाला होता, असे ठाकरे गटाने म्हटले. तेव्हा हा मोर्चा ‘फेल’ होता असे सांगणे म्हणजे गुंगीचा असर न उतरल्याचे लक्षण मानावे लागेल व अशा लोकांची उरलेली गुंगी नागपूरच्या अधिवेशनात उतरवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेना ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिवरायांचा अपमान करणारे भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे फडणवीस-शिंदे सरकारचे श्रद्धास्थान असल्याचे ठाकरे गटाने म्हटले. फडणवीस आणि इतर मंडळी या अपमानकर्त्याच्या इतक्या प्रेमात पडली आहे की, भगतसिंह कोश्यारींचा अश्वारूढ पुतळा उभारून हे लोक समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वारावर उभारून त्यांच्या नावाने एखादे महाराष्ट्रगीत रचतात की काय असे आता जनतेला वाटू लागले, असा टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान गिळून ढेकर देणारे सरकार महाराष्ट्रप्रेमी मोर्चेकरांचा असा अपमान करीत आहे. मोर्चा फेल झाला असे छाती पिटून विकट हास्य करीत आहेत. ही एक प्रकारची विकृती असल्याचे ठाकरे गटाने म्हटले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
‘आम्हाला महाराष्ट्राचा लवासा करायचा नाही’; मुख्यमंत्री शिंदेनी लगावला अजितदादांना टोला

‘आम्हाला महाराष्ट्राचा लवासा करायचा नाही’; मुख्यमंत्री शिंदेनी लगावला अजितदादांना टोला

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group