Friday, February 3, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

‘आम्हाला महाराष्ट्राचा लवासा करायचा नाही’; मुख्यमंत्री शिंदेनी लगावला अजितदादांना टोला

by Team Global News Marathi
December 19, 2022
in राजकारण
0
‘आम्हाला महाराष्ट्राचा लवासा करायचा नाही’; मुख्यमंत्री शिंदेनी लगावला अजितदादांना टोला

 

आजपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि धोरणांवर आक्षेप घेत सरकारच्या चहापानावर बहिष्कार करत असल्याचे जाहीर केले. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे सरकार स्थगिती सरकार असल्याची टीका केली होती. मात्र त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

स्थगितीच्या बाबतीत सांगाल, तर अनेक विभागामध्ये दोन हजार कोटींची तरतूद होती. प्रशासकीय मान्यता दिली सहा हजार कोटींची. हे काय कारभार चालला होता आघाडी सरकारमध्ये. आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या. पण, आम्हाला या राज्याचा लवासा करायचा नाही, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांची हवाच काढली. विभागांना मिळालेल्या तरतुदीनुसार निधीचे वाटप करायला पाहिजे. आमचे सरकार आल्यानंतर काही कामांना स्थगिती दिली आहे. ७० ते ८० टक्के कामांना मंजुरी दिली. आवश्यक त्या कामांवरील स्थगिती उठविली आहे. आकस ठेवून कुठल्याही कामांना स्थगिती दिलेली नाही.

पूर्वी शिवसेना-भाजप युतीचं सरकार होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर किती कामांना स्थगिती दिली. हे अजित पवार यांना माहिती आहे. कारण ते अर्थमंत्री होते. अजित पवारांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभणारी नाही आहे. खोक्यांचा एकावर एक ढिग लावला तर ‘शिखर’ इतके उंच होईल की, तिथेपर्यंत नजर पोहचणार नाही. तिथून कडेलोट होईल, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.

तसेच आनंदाचा शिधा किती लोकांपर्यंत पोहचला याची आकडेवारीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली. ९६ टक्के लोकांना शिधा पोहचला असल्याचे सांगत अजित पवार यांच्या आरोपाची शिंदे यांनी हवा काढली.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
शेअर बाजारात सेन्सेक्सने ओलांडला ६१ हजार अंकांचा टप्पा

शेअर बाजारात सेन्सेक्सने ओलांडला ६१ हजार अंकांचा टप्पा

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group