खोके-खोके म्हणून कोणाला हिणवता… ; दीपक केसरकर ठाकरेंच्या टीकेवर संतापले

 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याच्या शेतकरी संवाद मेळाव्यातून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. तसेच शिंदे गटाला खोके सरकार म्हणून ठाकरेंनी हिनवले . ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी संताप व्यक्त केला. खोके-खोके म्हणून कोणाला हिणवता. एक दिवस या आमदारांचा संयम सुटेल त्यावेळी तुम्हाला समजेल. फ्रिजचे मोठे खोके भरून पैसे कोणाकडे गेले हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दीपक केसरकर यांनी ठाकरेंना दिला .

तुम्ही कोणाला गद्दार म्हणता तुम्हाला भेटायला २५ आमदार आले होते. ते तुम्हाला सांगत होते हिंदुत्वापासून दूर जायला नको, आपण कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीपासून (NCP) दूर जाऊ, पण तुम्ही ऐकलं नाही. आता तर तुम्ही खोटं बोलण्याची मोहीम चालवलीय. मात्र तुम्ही कोणाची बदनामी करता? ज्या लोकांनी तुमच्यासाठी पूर्ण जीवन ओतलं त्यांची बदनामी करता. पण ज्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीसाठी हिंदुत्व सोडलं ना त्यांना विचारा आयोध्याची रथयात्रा कोणी आडवली होती. आता हिंदुत्व कोणाला शिकवता, असे म्हणत केसरकर यांनी ठाकरेंवर टीका केली.

आमची बदनामी करण्यासाठी तुमचे माणसं महाराष्ट्रभर फिरतात. पण बदनामी करण्याची पण एक मर्यादा असते हे लक्षात घ्या.आम्ही जर तुमच्याबद्दल बोलायला लागलो तर तुमचीही बदनामी होईल. आता पाणी नाकाच्या गेले आहे. मात्र तुमचा आदर आहे म्हणून आम्ही बोलत नाहीत, असेही केसकर म्हणाले. आता केसरकारांच्या या आरोपांवर उद्धव ठाकरे तसेच ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: