सतत आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने लोकसंख्याच्या मुद्द्यावरून दोनच दिवसांपूर्वी ट्विट केले होते. ज्यांना तीन मुले आहेत, त्यांना तुरूंगवासाची शिक्षा झालीच पाहिजे, असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. तिसरे मुल जन्माला आल्यास दंड आणि तुरूंगवास झाला पाहिजे अशी मागणीही तिने केली होती. मात्र आता कंगनाच्या या वक्तव्यामुळे ती ट्रोल होत असून यावर तुला दोन भाऊ-बहिण आहे असल्याची आठवण देखील नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.
वाढत्या लोकसंख्याच्या मुद्द्यावरून कंगनाने ट्विट केले होते की, लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला कठोर कायदे करण्याची गरज आहे. हे सत्य आहे, इंदिरा गांधी निवडणूक हारल्या होत्या. त्यानंतर त्यांची हत्या देखील झाली होती. कारण त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. जर तिसरे मुल झाले, तर दंड आणि तुरूंगवास झालाच पाहिजे असे ट्विट कंगनाने केले होते.
तिच्या या ट्विटनंतर तिला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. कॅमेडियन सलोनी गौरने कंगनाच्या भावंडांचा फोटो स्क्रिनशॉट काढून पोस्ट केला आहे. सध्या कंगनाचे हे ट्विट तुफान चर्चेत आहे. नेटकरी देखील तिला तुफान ट्रोल करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याच ट्विटमुळे ती तोंडघशी पडली आहे.