दिल्लीत प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान…मोदी म्हणतात की

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान…मोदी म्हणतात की

दिल्लीत शेतकरी आंदोलनाला दरम्यान २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या माद्यमातून जनतेशी संवाद साधला. ”दिल्लीत २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला.” असे पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवले होते.

तसेच ”आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचे आहे. आपण मागील वर्षी असाधरण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात देखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचे आहे. असे देखील यावेळी मोदी म्हणाले.

या अगोदर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मी नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी.” असं सांगितलं होतं. तसेच, शेतकऱ्यांपासून आपण फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत, असंही मोदी म्हणाले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: