आयएनएस विक्रांत निधी प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चंगलेचं तापलं असून पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप लगावला आहे. आयएनएस विक्रांत निधी गैरव्यवहार प्रकरणावरुन राऊतांनी किरीट सोमय्या यांना टीकेचं लक्ष्य केलंय. या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणात सोमय्यांचे लोक राजभवनात जाऊन जुन्या तारखेची कागदपत्रं तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राजभवनानं अशा देशविरोधी कृत्यात सहभागी होऊ नये, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
आयएनएस विक्रांत निधी प्रकरणातील घोटाळा हा मोठा आहे. यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. मोठमोठ्या लोकांना धमकावून हे लोक पैसे काढत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे. दिल्लीतून दबाबव आणून खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयतन होत असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे.
न्यायालयात सत्याचा विजय होईल. कालपासून किरीट सोमय्या यांच्या टोळीची माणसे राजभवनाकडे जात आहेत. जुन्या तारखेची कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं राजभवनानं या कृत्यामध्ये सामील होऊ नये अस राऊत म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या फरार असल्याचा दावा केला आहे. हे दोघे मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहित ? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.