पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचयव्हर घणाघाती टीका केली आहे, ज्यांना हिंदू समाजाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याची ॲलर्जी आहे त्यांना पाठबळ देणे हे कसले हिंदुत्व, अशी विचारणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात केली.तुम्हाला जर मशिदीवरील भोंगे चालत असतील तर मग हनुमान चालीसा म्हटली तर राग का येतो, असा सवालही त्यांनी उपस्थित करत राज ठाकरेच्या विधानाला पाठिंबा दिला होता.
फडणवीस यांनी ‘कोल्हापूर उत्तर’च्या पोटनिवडणुकीत नाना कदम यांच्या प्रचारार्थ शनिवारी जाहीर सभा घेतली. रविवारी पत्रकार परिषद घेतली व त्यामध्ये हिंदुत्वावर भर दिला. ते म्हणाले, ज्यांनी भगव्याचे नाव घेतले पाहिजे ते आता भगव्याची ॲलर्जी असणाऱ्यांच्या पाठीशी लागले आहेत. म्हणून भगव्याचे रक्षण करण्याकरिता आम्ही मैदानात उतरलो आहोत. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, ज्यांनी विचारणा केली की क्या राम यहां पैदा हुअे थे इसका क्या सबूत है, यांच्याविरोधातील ही लढाई आहे.
रामसेतूला विरोध करणारे, रामही काल्पनिक थे और सेतू भी काल्पनिक था, असे म्हणणाऱ्यांशी ही लढाई आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा दिल्यानंतरही नरेंद्र मोदी नावाच्या वाघाने हे कलम रद्द केले. पण कुणाच्या बापाची विरोध करण्याची हिंमत झाली नाही असे सुद्धा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखविले होते.