शाहरुख खानच्या पठाण सिनेमात ‘बेशरम रंग’ गाण सध्या वादाच्या भोवारीत अडकले आहे. बिकीनीच्या रंगांवरुन वाद चांगलाच पेटत चाललाय. भगव्या बिकीनीमुळे अयोध्येचे महंत यांनी सिनेमा थिएटरच जाळण्याची गोष्ट केली आहे. हिंदूंनी केलेला विरोध हा भगव्या बिकीनीमुळे ओढावला आहे पण आता तर मुस्लिम संघटनेनेही पठाणला विरोध केलाय. आता मुस्लिम संघटनेचा नेमका आक्षेप तो काय ?
उलेमा बोर्डाचे अध्यक्ष सैय्यद अनस अली यांनी पठाण वर आक्षेप घेतला आहे. पठाण देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भुमिका उलेमा बोर्डाने घेतली आहे. सैय्यद अनस अली एएनआयशी बोलताना म्हणाले, ‘या चित्रपटाने मुस्लिम समाजीचीही भावना दुखावली आहे. या सिनेमाला केवळ मध्य प्रदेशच नाही तर पूर्ण देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही. मुस्लिम समाजात पठाण खूप प्रतिष्ठित आहेत.
यातून केवळ पठाणांची नाही तर संपूर्ण मुस्लिम समाजाला बदनाम केले जात आहे. पठाण चित्रपटाचे नाव आणि त्यात महिलांचा अश्लील डान्स हे खपवून घेतले जाणार नाही.’सैय्यद अनस अली म्हणतात, ‘मेकर्सने पठाण हे नाव काढून टाकले पाहिजे. शाहरुखला त्याच्या भुमिकेचे नाव बदलावे लागेल. त्यानंतर पाहिजे ते करा. पण आम्ही हा चित्रपट देशात रिलीज होऊ देणार नाही. आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि एफआयआर सुद्धा करु. रिलीज थांबवण्यासाठी सगळं काही करु.’
ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटीनेही पठाण ला विरोध केला आहे. कमिटीचे अध्यक्ष पीरजादा खुर्रम मिया चिश्ती विरोध करताना म्हणाले, पठाण मधून मुस्लिमांच्या भावना भडकवल्या जात आहेत. मला २४ तासाच्या आत ४०० हून जास्त फोन आले आणि हा सिनेमा मुस्लिमविरोधात आहे असे सांगण्यात आले. सर्वात जास्त फोन बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकआणि तेलंगाणा मधून आलेत. मुस्लिम धर्माची प्रतिमा मलीन करण्याची करण्याची परवानगी कोणालाही नाही. मग तो शाहरुख खान असो किंवा अजून कोणी असो.’