स्त्री शिक्षणाचे जनक तसेच देशात मुलींसाठी पहिला शाळा सुरू झाली ती पुण्यामध्ये करण्यात आली. ही शाळा सुरू करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करत महात्मा फुलेंनी १८४८ रोजी मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली. आजही अनेक भागातील मुलींना शिक्षणापासून दूर रहावे लागत आहे. मात्र आता महात्मा फुले यांचं मुळ गाव असणाऱ्या खानवडीत मुलींची मोठी शाळा बांधली जाणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात दिली.
याठिकाणी महात्मा फुलेंचं स्मारकही होईल. तसेच सातारा, खानवडी आणि पुणे अशा तीनही ठिकाणी मुलींच्या शाळा बांधण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती खासदार सुळे यांनी दिली. तसेच राज्यातील ऐतिहासिक ठिकाणांचा विकास आणि डागडुजीवरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
तसेच लक्षमीपुर पत्रकारानी बोळ्याने त्या म्हणाल्या की, लखीमपूर हत्याकांडासारखी प्रकरणे आम्ही कधीच सहन करणार नाही. असा कुठलाही अन्याय कोणत्या महिलेवर आणि शेतकऱ्यांवर होणार असेल तर कोणाचीही सत्ता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सहन करणार नाही. तिथे लोक शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत होते. त्यांच्यावर झालेला हल्ला उत्तर प्रदेश सरकारनेच केला आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.