राज्यभर फिरण्यापेक्षा फणवीसांनी नागपुरात लक्ष घालावे – राजेश टोपे
भाजपाने मंदिरे उघडी करण्यासाठी जे आंदोलन केले त्यात केवळ राजकारण दिसून येत आहे. असे राजकारण त्यांनी करू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या पाठिशी सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन टोपे यांनी केले. काल भाजपा पक्षाच्या वतीने सर्व मंदिराच्या बाहेर मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद अंदोलन करण्यात आले होते. यावरच काल मंत्री टोपे यांनी भाष्य केला आहे.
पुढे विरोधी नेते फडणवीसांना टोला हाणताना टोपे म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बारामतीत दौरा करतात. त्याला कुणाचीही हरकत नाही. त्यांनी जरूर सगळी माहिती घ्यावी परंतु करोना संसर्गाच्या साथीच्या संदर्भात त्यांनी राजकारण करू नये.
लोकल सेवा सुरु करण्याची मुंबई डबेवाल्यांची मागणी
फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याचा अधिकार आहे मात्र नागपूर मध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी नागपूरमध्येही थोडे लक्ष घालावे, असा टोला टोपे यांनी यावेळी लगावला.
३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही; वाचा अनलॉक ४ ची नियमावली