सरकार कंगनाला सुरक्षा का देत नाही -आमदार राम कदम
ग्लोबल न्युज : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत ड्रग्ज संबंधित माफिया नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार असताना राज्य सरकार तिला सुरक्षा का पुरवत नाही? असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
काही दिवसापूर्वी राणावत हिने ड्रग्जशी संबंधीत नावे सांगणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र कंगनाच्या या निर्णयाचे स्वागत करत सरकारने अद्याप पर्यंत सुरक्षा का पुरवली नाही ? असा सवाल आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
रियाचे वकील असल्यासारखे आघाडी सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे. याचा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे.
या पत्रात राम कदम म्हणतात की, “सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीला एका फोन कॉलवर मुंबई पोलिसांकडून सुरक्षा उपलब्ध झाली. दुसरीकडे कंगनाने सुरक्षा पुरवल्यास बॉलिवूड आणि मुंबईतील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र तिला साधे उत्तरही न दिल्याने दुहेरी मापदंडामुळे संशय उत्पन्न होत आहे” असा सवाल त्यांनी विचारला आहे.