शिंदे गटाचे आमदार संतोष बगर नेहमीच आपल्या वादग्रस्त निधनामुळे तर वर्तणुकीमुळे चर्चेत असतात अशातच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान दिलेलं चॅलेंज शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बांगर खरंच मिशा काढणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर विरोधकांनी थेट निशाणा साधला आहे.
प्रकरण असे की, कळमनुरी बाजार समितीचा निकाल लागला. शिवसेना आमदार संतोष बांगर विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. मविआने आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे निवडणूक लढवत बांगरांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. आणि हाच प्रयत्नात बांगरांचा गेम झाला. या निवडणुकीत 17 पैकी केवळ 5 जागांवर बांगरांच्या पॅनेलला समाधान मानावं लागलं. तर मविआला तब्बल 12 जागा मिळाल्या. मविआने बांगरांना दणक्यात पराभव केला. पण गोष्ट निकालानंतर संपली नाही, तर बांगर स्वतःच दिलेल्या एका चॅलेंजमुळे अडचणीत आले आहेत.
पण आता संतोष बांगरांना स्वतःचं दिलेलं चॅलेंज अंगलट आलं आहे. 17 पैकी 17 जागा जिंकणार असं म्हणालेले. पण केवळ 5 जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळेच आता बांगर मिशा कापणार का?, यावरून विरोधक त्यांना सातत्याने डिवचत आहेत ‘प्रिय लाडक्या संतोष दादुड्या “मूछ” कधी काढतोय मग?’ असं म्हणत अयोध्या पोळ-पाटील यांनी तर चक्क एक रेझर दाखवत संतोष बांगर यांची खिल्ली उडवली आहे ळे आता संतोष बांगर त्यांनी दिलेलं चँलेज पूर्ण करणार का? अशी चर्चाच संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.