मुंबई | देशभरातील कोरोनाची प्रकरणं सध्या काही प्रमाणात कमी होत आहेत, परंतु धोका अद्याप टळलेला नाही. मुंबईतील काही भागांतून कोरोनाची नवीन प्रकरणं सतत समोर येतायत.लसीकरण मोहिमेने थोडाफार दिलासा दिला असून तरी नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणेचे गरजेचे आहे. त्यामुळे शनिवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने १३ इमारती सील केल्या आहेत.
त्यातच वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लादले गेले नाहीत तर कोरोनाची प्रकरणं वाढू शकतात, असा धोका अधिकाऱ्यांना आहे. शनिवारी मुंबईत कोरोनाचे एकूण १९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका व्यक्तीचा विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत मुंबईतील रुग्णालयातून ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दरम्यान कोरोनाच्या ३७,६६१ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आतापर्यंत १,२१,०८,८४६ नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या रिकवरी रेट ९७ टक्के आहे.
दुसरीकडे, पुण्याच्या ग्रामीण भागात १०० नवीन रुग्ण आढळले आहेत आणि पुणे शहरात ८८ नवीन रुग्ण आढळले आहेत. बीएमसीच्या मताप्रमाणे, सध्या सर्वाधिक ३१४ एक्विव प्रकरणं मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात आहेत. त्यानंतर वांद्रेत २१४ अंधेरी पूर्वमध्ये १९६ आणि बोरिवलीमध्ये १९१ प्रकरणं आहेत. मुंबईत सध्या २० हून अधिक इमारती सील करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती नियंत्रणात आहे. यावेळी लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितलं जातं आहे.