मुंबई : राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर इतर सर्व गोष्टीवर कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यातच आज लॉकडाउनचा कार्यकाळ संपुष्ठात येण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील वाढता कोरोना, लॉकडाऊन, कोरोना लसीकरण या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एखादी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या संपूर्ण देशभरात १ मे पासून सुरु होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्तास सुरवात होणार नाहीये. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच दिली आहे.
त्यात उद्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आज नेमकं काय संवाद साधणार याकडे सर्व जनतेचे तसेच विरोधकांचे सुद्धा लक्ष लागून राहिले आहे.