कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या मार्गिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्र्यांनी जागवल्या जुन्या आठवणी |

 

मुंबई | कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सीलिंक ते बीकेसी संकुल मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. उड्डाणपुलाची ही मार्गिका आज वाहतुकीसाठी खुला झाल्याने, या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या परिसरात माझे बालपण गेले. १९६६ पासून आम्ही या परिसरात राहतो आहोत. या परिसराशी निगडीत खूप आठवणी आहेत. आता या परिसरात खूप वस्ती वाढली आहे. बीकेसी सारखे संकुलही उभे राहीले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा समस्या निर्माण होऊ लागली होती. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने आता कलानगर जंक्शन येथे आणि परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा वरळी सागरी मार्ग / एस. व्ही मार्ग, सायन/ धारावी रस्ता, बांद्रा-कुर्ला संकुल जोडरस्त्यासहीत इतर दोन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. वाहतुकीच्या वेळेत साधारण 10 मिनिटे बचत होणार आहे.

Team Global News Marathi: