नवी दिल्ली | मंगळवारी लोकसभेमध्ये भाजप खासदाराने केलेल्या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा रंगली असून जात निहाय जनगणनेचा मुद्दा मांडताना खासदार संघमित्रा मौर्य यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भाषणामुळं भाजपमध्ये चांगलीच चर्चा सुरु होती.
मंगळवारी ओबीसीशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकावर (१२७ वी सुधारणा) २०२१, सभागृहात चर्चा सुरु होती. दरम्यान भाजपच्या वतीने बदायूंच्या खासदार संघमित्रा मौर्य यांना यावर बोलण्याची संधी मिळाली. संगमित्र म्हणाल्या की, “गुरांची गणना सुद्धा राज्यनिहाय केली गेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किती गुरे आहेत तसेच कोणत्या जिल्ह्यात जास्त जनावरं आहेत. मात्र, मागासवर्गीयांची जनगणना केली गेली नाही.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “आज, पंतप्रधानांनी राज्यांना लोकसंख्येची जात गणना करण्याचे अधिकार दिले आहेत. मागासवर्गीय, आमच्या जातीचे आणि समाजाचे लोक, केवळ निवडणुकीच्या वेळीच फोकस बनतात. मात्र, मला खात्री आहे की, येणाऱ्या काळात आम्ही केवळ निवडणुकीच्या वेळीच नव्हे तर इतर वेळीसुद्धा सर्वांसाठी महत्त्वाचे असू. असे त्यांनी बोलून दाखविले होते. यावर भाजपा काय पप्रतिक्रियादेते हे पाहावे लागणार आहे.