महाराष्ट्रामध्ये एकीकडे शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष सारकर्ब्सथपं करत आहे. पण, अशा या वातावरणामध्ये नेत्यांना धमकीचे फोन आणि पत्र येत असल्याचे समोर आले आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. जीवे ठार मारण्याची धमकी लाड यांना देण्यात आली आहे. या प्रकारानंतर लाड यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. एका अज्ञात फोन नंबरवरून प्रसाद लाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांपासून एका अज्ञात फोन नंबरवरून धमकीचे फोन येत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माझ्या जीवाला धोका आहे, असं प्रसाद लाड म्हणाले आहे. या प्रकारानंतर प्रसाद लाड यांनी पोलीस गुन्हे सहआयुक्त यांच्याकडे तक्रार केली असून सीडीआर काढण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि महापौर किशोरीताई पेडणेकर यांना सुद्धा पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
अत्यंत अश्लिल भाषेत हे पत्र लिहून धमकी दिली आहे. किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देणात आली आहे. हे पत्र उरणमधील विजेंद्र म्हात्रे नावाच्या वकिलाने पाठवले आहे. या वकिलाने याआधीही असंच पत्र पाठवले होते. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच सरकार पाडले जात आहे, असा उल्लेख ही विजेंद्र म्हात्रे याने केला आहे. हे पत्र विजेंद्र म्हात्रे या नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिलं आहे.