राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारलवर टीका करण्याची एकही संधी साधताना दिसत नाही. त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी दिलेल्या अश्वासनाची आठवण करून देत मनसेने शिवसेना पक्षाला टोला लगावला आहे. सरचिटणीस संदीप देशपांडे याने ट्विट करून महात्मा गांधी यांच्या प्रार्थनेचा संदर्भ देत टोला लगावला आहे.
रघुपती राघव राजाराम .पतित पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान.सत्याचा धडा देण्याऱ्या महात्मा गांधीजी ना विनम्र अभिवादन pic.twitter.com/9pW67reHCQ
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 2, 2020
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा तो व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यासोबत देशपांडे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रसिद्ध प्रार्थनेत एका शब्दाचा बदल करून राज्य सरकारला टोला हाणला आहे. ‘रघुपती राघव राजाराम. पतित पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान’ असं त्यांनी म्हटलं आहे. सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन, असंही त्यांनी म्हटलं आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध पक्षांनी जनेतवर आश्वासनांची खैरात केली होती. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असलेला टोलचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. राज्यात शिवसेनेचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. आता या टीकेला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.