‘Why I Killed Gandhi’ या चित्रपटात कसदार अमोलकोळे यांच्या भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे अभिनेते अमोल कोल्हे यांना ट्रोल करण्यात येत आहे. तर काहींनी त्यांना समर्थन देत भूमिका केली म्हणून गांधी हत्येचं समर्थन केलं असं होत नाही. असा पवित्रा घेतला आहे.
या सर्व प्रकरणात आता अभिनेते नाना पाटेकर यांनी भूमिका मांडली आहे. अभिनेते नाना पाटेकर नेहमीच रोखठोक मत मांडताना दिसून येतात. त्यांनी आजपर्यंत अनेक विषयांवर आपलं मत मांडलं आहे. आजही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे.
या प्रकरणावर आपलं मत मांडताना अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे, ‘कुणी भूमिका केली म्हणून नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन करतंय असं होत नाही. मीसुद्धा ‘लास्ट व्हाईस रॉय माउंट बॅटन’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्या विचारांचं समर्थन करतो असं मुळीच होत नाही. तो फक्त अभिनय आहे.
सध्या ‘Why I Killed Gandhi’ या चित्रपटावरून जोरदार वाद सुरु आहे. या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली म्हणून कुणी अभिनेते अमोल कोल्हे यांना कडाडून विरोध करत आहेत. तर कुणी त्यांना पाठिंबा देत आहे. यासर्व प्रकरणात आता अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.