आदित्य ठाकरेंच्या टीकेला नाना पटोले यांचा सणसणीत टोला

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अडीज वर्ष लोटलेली असताना दुसरीकडे मात्र या तिन्ही पक्षात वाद होत असल्यचाहे चित्र दिसून येत आहे अशातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट शिवसेना विरोधात बंद पुकारले आहे. अशातच सेनेच्या टीकेला नाना पटोले यांनी जोरदार टोला लगावला आहे. ‘आमचे गुडलक सोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात’ असं म्हणत नाना पटोले यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आघाडीत आंही वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसंच, आमदार निधी वाटपावरून चुकीच्या मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी, असा सल्लाही पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना दिला. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना मुंबई कधी तुंबली नाही, असे वक्तव्य पटोले यांनी नागपुरात केले होते. पण, ‘त्याला आता 25 वर्षे उलटून गेली आहे. आता ते सोबतच आहेत त्यामुळे बघुया त्याचं गुडलक कामाला येतंय का? असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी नाना पटोलेंना लगावला होता.

नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी आदित्य ठाकरे यांच्या विधानावरून टोला लगावला. ‘आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या बाजूने मत मांडले आहे. पण आमचा गुडलकसोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. ‘राज्यसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडी सरकारची अद्याप बैठक झाली नाही.

Team Global News Marathi: