आळस काढणाऱ्या राजाचे राज्य टिकत नाही; बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना टोला

 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा अद्यापही मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, माजी मंत्री बच्चू कडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.

अशातच आता त्यांनी अमरावतीत झालेल्या एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बच्चू कडू म्हणाले, आळस काढलेल्या राजाचे राज्य टिकत नाही हे आपण दाखवून दिले, असा टाेला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

पुढे बच्चू कडू म्हणाले, मी राजा झालो म्हणून झोपायचे ठरलेले वेळातच भेटायचे असे, होता कामा नये. एक तर राजा व्हायचे नाही आणि झालेच तर मग आळस काढल्यावर त्या राजाचे राज्य टिकत नाही हे आपण दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले. तसेच, जेव्हा मंत्रिपदाची रेस सुरू होती तेव्हा प्रत्येक जण चांगले खाते मागत होते. सगळ्या गोष्टींनी वजनदार खाते मागण्याची रेस सुरू होती; परंतु मी राज्यातील पहिला माणूस होतो की उद्धव ठाकरे यांना मी दिव्यांग मंत्रालय मागितले, असेदेखील यावेळी बच्चू कडूंनी नमूद केले.

Team Global News Marathi: