मुंबई | २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे अशातच आता महाराष्ट्र सुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-फडणवीस असा सामना रंगताना दिसून येणार आहे अशातच आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वनहुमीवर मोठे विधान केले आहे, 2024 च्या निवडणुकीत देशात शंभर टक्के परिवर्तन झालेलं असेल असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीनं आशादायी चित्र असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकू असेही राऊत म्हणाले. काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल हे सोमवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी भेट घेतली आहे. शरद पवार उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली आहे. राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे येणारीआ २०२४ ची निवडणूक भाजपासाठी आव्हान उभे करणार असेच चित्र दिसून येत आहे,