२००९ ला वैभव नाईक काय होता आणि आज संपत्ती कशी काय वाढली?

 

भाजप नेते नितेश राणे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच आमदार वैभव नाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. २००९ ला हा माणूस काय होता आणि आज संपत्ती कशी काय वाढली? २००९ ते २०१४ एक कोटी वरून सात कोटी संपत्ती झाली. २०१४ ते २०१९ सात कोटी वरून २२ ते २५ कोटी इतकी त्यांची संपत्ती झाली. वैभव नाईकांनी बेनामी मालमत्तेसह १५० कोटीहून अधिक संपत्ती जमा केली आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.

उद्धव ठाकरे स्वतः ला मर्द म्हणून संबोधतात. पण ते नपूसंक आहेत, अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. २००९ ते २०१९ या काळात वैभव नाईक यांच्या संपत्तीत 300 पटीने वाढ झाली आहे.भास्कर जाधव यांच्या मांडीवर बसून रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात जाऊन वैभव नाईकांनी माहिती द्यावी, असंही नितेश राणे म्हणालेत.

वैभव नाईक तुम्हाला उद्धव ठाकरे बरे वाटतायेत, पण ते कसा वापर करून घेत आहेत हे आता कळणार नाही. हळूहळू स्पष्ट होतं. हवं तर रामदास कदम यांना विचारा.नारायण राणेंनी सेना सोडल्यावर रामदास कदमकडून काय बोलवून घेतलं ,आज ते काय बोलतात ते ऐका भास्कर जाधव,ऐका अरविंद सावंत…, असंही नितेश राणे म्हणालेत.

 

Team Global News Marathi: