“आपला देश उद्योगपती मित्रांच्या घश्यात घालण्याचं काम मोदी करत आहेत”

 

काँग्रेस मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करताना अनेकवेळा दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं केलं असून जगाला आदर्श लोकशाही दाखवण्याचं काम आपल्या देशाने केलं आहे. तसेच गेल्या ७० वर्षात देशाने सार्वजनीक क्षेत्रात मोठी उंची गाठली आहे. सद्ध्या देशात खाजगीकरणाचं वार वाहत असून, यावरून विरोधी पक्ष काॅंग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

modi

महाराष्ट्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खाजगीकरणावरून केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच देशाला दिशा देण्याचं काम पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात झालं आहे. नेहरूंनी देशाला लागणाऱ्या सर्व गोष्टींची सार्वजनीक निर्मिती केली, पण त्या सर्व मोदी विकायला काढत आहेत. आपल्या उद्योगपती मित्रांच्या घश्यात देश घालण्याचं काम मोदी करत आहेत, अशी जहरी टीका नाना पटोले यांनी मोदींवर केली आहे.

कडेगावच्या वांगी येथील सोनहीरा साखर कारखाना परिसरात आयोजीत कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. यावेळी मोदी देश विकण्यासाठी सत्तेत बसले आहेत. काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाावागावात जाऊन मोदी सरकारचं पितळ उघड केलं पाहिजे, असंही नाना पटोेले यावेळी म्हणाले.

Team Global News Marathi: