येत्या २ दिवसात महाराष्ट्रात थंडीची लाट, काळजी घेण्याचे आवाहन

 

मागील मागच्या काही दिवसांपासून हिमवृष्टी होत असल्याने उत्तरेतील राज्यात थंडीची लाट कायम आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे थंडीची लाट कमी झाली होती. मात्र पुढच्या दोन दिवसांत पुन्हा थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढच्या ४८ तासांत याची तिव्रता दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. किमान पारा 2 ते 4 अंशांनी खाली घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये मोठा हिमवर्षाव झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत दिसण्याची शक्यता आहे. पुढच्या दिवसांत राज्यातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये मंगळवारी मोठा हिमवर्षाव झाल्याने त्या भागातील तापमान उणे 8.1 अंशांपर्यंत खाली गेले आहे.

जम्मूमधील संपूर्ण गुलमर्ग शहर बर्फाच्छादित झाले आहे. तेथे लोक घरात अडकून पडले आहेत, तर लडाखचे तापमान उणे 14.1 अंशांवर गेले असून, तेथेही मोठा हिमवर्षाव सुरू आहे. याचा प्रभाव राजस्थानवरही झाला असून, तेथे काही भागांत पारा 5 अंशांवर खाली आला आहे. या वातावरणामुळे उत्तर भारतातून थंड वारे महाराष्ट्रात आगामी 48 तासांत येत आहे. दोन दिवसांत राज्यातील पारा घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Global News Marathi: