हो आमच्या शिवैनिकांनी बाबरी पडली हे सांगायला धाडस लागते – संजय राऊत
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राम मंदिरावरून भाजपाला टोला लगावला आहे. काल ते बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना राम मंदिराच्या मुद्द्यावर आपले परखड मत मांडले होते. राम मंदिर लढ्यातले योगदान मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. जेव्हा भलेभले ‘आम्ही बाबरी पाडली नाही, शिवसेनेने केले’ असे म्हणत पळून जात होते. तेव्हा आम्ही ठामपणे उभे राहिलो, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखविले.
राम जन्मभूमीच्या आयोजकांनी राम मंदिराच्या लढ्यामध्ये ज्यांचे योगदान आहे, त्यांना बोलवायला पाहिजे. बाबरी पाडल्याचा जो खटला आहे, त्यात शिवसेनेचे लोक आजही आरोपी आहेत. म्हणजे त्यादृष्टीने आम्ही राम मंदिर लढ्यातले स्वातंत्र्यसैनिक आहोत, अशी भूमिकाही राऊतांनी यावेळेस मांडली.
राम मंदिराच्या लढ्यात ज्यांचा कसलाच संबंध नव्हता.अशा व्यक्तींना भूमीपूजनाचे आमंत्रण आहे. लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढलीच नसती तर पुढचं रामायण घडलंच नसतं, असं म्हणत राऊतांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली आहे.